Friday, 10 January 2025

 

Project- कणाद :

 Science Exibition Platform

कणाद हा तुरिय लॅबचा प्रमुख प्रकल्प आहे, जो मुलांमध्ये सर्जनशीलता, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी तयार केला आहे. या उपक्रमांतर्गत मुलांना सामाजिक समस्यांवर आधारित त्यांच्या अभिनव कल्पना सादर करण्यासाठी एक व्यासपीठ दिले जाते.

कणाद च्या कार्याचे मुख्य तत्त्व म्हणजे मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना वास्तविक जगातील समस्यांवर विचार करण्यासाठी प्रेरित करणे. जेव्हा मुले एखादी सामाजिक समस्या पाहतात—पर्यावरण, आरोग्य, शिक्षण किंवा सामुदायिक कल्याण यासंबंधित—त्यांना ती सोडवण्यासाठी नवीन कल्पना सुचतात. मात्र, त्या कल्पना साकार करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे साधन किंवा मार्गदर्शन नसते.

इथे कणाद त्यांना पाठिंबा देते. हा प्रकल्प फक्त या तरुण संशोधकांना त्यांच्या उपाययोजना सादर करण्यासाठी व्यासपीठ देत नाही, तर त्यांना वैज्ञानिक साधने, उपकरणे आणि मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देतो. यामुळे कल्पनेतून अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास सोपा होतो आणि मुलांना त्यांच्या सर्जनशील संकल्पनांना प्रत्यक्षात साकार करण्याचे सामर्थ्य मिळते.

कणाद च्या माध्यमातून तुरिय लॅब एक सामाजिकदृष्ट्या जबाबदार पिढी घडवण्याचा प्रयत्न करते, ज्यांना सकारात्मक बदल घडवण्यासाठी विज्ञानाचे महत्त्व समजते. या प्रदर्शनांद्वारे सहभागी आणि समाजासाठी प्रेरणादायक कार्य घडते, ज्यामध्ये तरुण मनांची कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञानाचा वापर दिसून येतो.

पाणी वाचवण्यासाठी एखादे उपकरण तयार करणे, कचरा व्यवस्थापनासाठी उपाय सुचवणे किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी मदत करणारे साधन शोधणे—कणाद मुलांना मोठ्या कल्पनांवर विचार करण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रोत्साहित करते. 

मागील चार वर्षांपासून आमच्या शाळेतील विज्ञान प्रकल्प विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक घेत आहे. याचे मुख्य कारण शाळेत सुरु असलेला कणाद उपक्रम. आपल्या परिसरातील समस्यांचे निरीक्षण करून त्यावर वैज्ञानिक मार्गाने काय उपाययोजना करता येईल यावर वेळोवेळी शाळेतील प्रतोगशाळेत चर्चा करण्यात येते. एखाद्या समस्येवर उपाय म्हणून  मुलांच्या मनात काही कल्पना आली तर त्याला मॉडेल स्वरूपात आणण्यासाठी साहित्यांचा पुरवठा केला जातो. यावर्षी ही आम्ही एक प्रोजेक्ट तयार केला आहे.  मुलांच्या डोक्यातून आलेला हा विचार मॉडेल स्वरूपात आता तयार झाला आहे. 

 













Sunday, 5 January 2025


माझा गाव, माझी बातमी: एक शिक्षक म्हणून माझा अनुभव

 माझ्या शाळेत ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण देताना नेहमी विचार येत असे की, या विद्यार्थ्यांचे जग एका मर्यादेत का अडकले आहे? त्यांना शिक्षणाबरोबरच जीवनातील वेगवेगळ्या गोष्टींची ओळख कशी करून देता येईल? याच विचारातून "माझा गाव, माझी बातमी" या उपक्रमाची सुरुवात झाली.

उपक्रमाची कल्पना कशी सुचली?

ग्रामीण भागातील मुले त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल खूप चांगल्या निरीक्षणशक्तीने विचार करत असतात. मात्र, त्यांच्या कल्पना आणि विचार बाहेरच्या जगापर्यंत पोहोचत नाहीत. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना काहीतरी वेगळं शिकवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करण्याची कल्पना सुचली.

विद्यार्थ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव

या उपक्रमासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांना बातमी तयार करणे, कॅमेऱ्याचा वापर, व्हिडिओ एडिटिंग, आणि सोशल मीडियावर ते कसे अपलोड करायचे, याबद्दल शिकवले. मला आठवतं, पहिल्यांदा मुलांनी गावातील water system यावर  बातमी तयार केली. त्यांच्या डोळ्यातली उत्सुकता आणि आत्मविश्वास बघून माझं मन भरून आलं.

प्रत्येक मुलाकडे एक अनोखी दृष्टीकोन आहे. त्यांच्या कल्पना मी कधीही अडवल्या नाहीत, उलट त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे त्यांचं काम अधिक सृजनशील आणि स्वाभाविक वाटतं.

या उपक्रमाचा परिणाम

या उपक्रमामुळे माझ्या विद्यार्थ्यांनी केवळ पत्रकारिता शिकली नाही, तर त्यांनी शाळेत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. त्यांच्या बातम्यांमुळे गावातील अनेक समस्यांकडे लोकांचं लक्ष गेलं आहे.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे, या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि संवादकौशल्य वाढवले. आता ते आपले विचार निर्भयपणे मांडतात, जे मला एक शिक्षक म्हणून अत्यंत समाधानकारक वाटतं.



एक शिक्षक म्हणून समाधान

माझ्यासाठी "माझा गाव, माझी बातमी" केवळ एक उपक्रम नसून, विद्यार्थ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मला माझ्या विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकांपुरते शिकवण्यापेक्षा जास्त काहीतरी देण्याची संधी मिळाली.

पुढील स्वप्न

या उपक्रमाला पुढे नेऊन अधिक विद्यार्थ्यांना जोडण्याची आणि त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात यश मिळवून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन देण्याची माझी इच्छा आहे. "माझा गाव, माझी बातमी" हा उपक्रम केवळ शिक्षण नव्हे, तर सामाजिक बदल घडवण्याचे साधन बनले आहे.



Tuesday, 17 December 2024

 अमोलचा दादा चा  प्रेरणादायी वाढदिवस...





आजचा दिवस अमोलसाठी आणि माझ्यासाठीही विशेष होता. त्याचा वाढदिवस फक्त आनंद आणि गोडधोड यापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो एक समाजोपयोगी आणि प्रेरणादायी क्षण ठरला. वायफळ खर्च टाळून, तो वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा त्याने घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.आज अमोलने माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला. काल रात्रीच अमोल आणि माझा call झाला .. वाढदिवस आहे ,शाळेत येतोय ,मुलांना काय आणू ? आणि रात्रीच सर्व नियोजन करून तो  आज सहपरिवार शाळेत आला . मुलांसाठी नोटबुक्स , वह्या,पेन,पेन्सिली अशा अनेक गोष्टीसोबतच भरपूर खावू मुलांना  आज मिळणार होता . आज अमोल चा वाढदिवस शाळेत साजरा झाला.  साजऱ्या केलेल्या प्रत्येक क्षणात अमोलचा हेतू स्पष्ट जाणवत होता – आपल्या आनंदात दुसऱ्यांना सामावून घेणे आणि समाजाला काहीतरी चांगले देणे.शाळेतील मुलांनीही खूप उत्साहाने हा क्षण साजरा केला. अमोलने त्यांना केवळ वस्तू दिल्या नाहीत, तर त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांना शिकण्याची प्रेरणा दिली. मुलांचे चेहरे हसरे झाले आणि त्या आनंदात खऱ्या वाढदिवसाचा अर्थ दिसून आला.अमोलचा हा उपक्रम फक्त माझ्यासाठीच नव्हे, तर इतरांसाठीही एक चांगला संदेश आहे – आपण आपला आनंद इतरांसोबत शेअर केल्यावर तो अधिक वाढतो. वायफळ खर्च न करता आपण खरोखर गरजूंना मदत करू शकतो आणि आपल्या आनंदाच्या क्षणांना अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो.त्याच्या या कृतीने मला खूप प्रेरणा दिली आहे. तुझ्या या प्रेरणादायी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा, अमोल! जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
समाजात अमोलसारखी माणसं असणं ही खरोखरच आवश्यक गोष्ट आहे. अशा व्यक्ती आपल्या कृतीतून समाजासाठी सकारात्मक बदल घडवतात. अमोलने आपल्या वाढदिवसाचा आनंद वायफळ खर्च न करता गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर केला, हे त्याच्या संवेदनशीलतेचं प्रतीक आहे. समाजात अनेक लोक सण-उत्सव केवळ वैयक्तिक आनंदापुरते मर्यादित ठेवतात, पण अमोलसारखे लोक त्या आनंदाचा सामाजिक पैलूही लक्षात घेतात.

अमोलची ही कृती गरजू लोकांसाठी फक्त एक मदत नव्हे, तर प्रेरणादायी संदेश आहे की प्रत्येकाने आपल्या आनंदाचे थोडेसे क्षण इतरांसाठी द्यावेत. अशा व्यक्तींमुळे समाजात मानवतेचा वसा पुढे नेला जातो. त्यांनी केलेले कार्य इतरांनाही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देते. अमोलसारखी लोकं समाजातील नाती जोडतात आणि प्रेम, दया आणि सहकार्याचं दर्शन घडवतात. त्यांच्यासारखी माणसं समाजाचं खऱ्या अर्थाने वैभव आहेत.

Saturday, 7 September 2024

मदतीसाठी आवाहन


 

मदतीसाठी आवाहन 

शालेय जीवनापासूनच कलेला अनन्यसाधारण महत्व आहे.  प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्‍वाचे अंग बनलेले आहे. जे जे सौंदर्य पूर्ण व कलात्‍माक तेथे मानव आकर्षीला जातो. मानवाची दृष्‍टी जेव्‍हा कलेने किंवा सौंदर्याने भरून जाते जेव्‍हा तो कलेचा भोक्‍ता होतो. 


शालेयस्‍तरावर चित्रकला आवश्‍यक :

          शालेयस्‍तरावरील कलाशिक्षण आणि विशेषतचित्रकलेचे शिक्षण हे एक विशिष्‍ट प्रकारचे शास्‍त्र आहे. बालवयापासून मुलांनाच्‍या मनावर कलेचे संस्‍कार घडविणे म्‍हणजे ख-या अर्थाने चांगले सुसंस्‍कृत नागरिक बनविण्‍याचा विचार करणे हा या शास्त्राचा मूलभूत आधार आहे. सामान्‍य नागरिकांच्‍या मते मुलोच्‍य पुढील अयुष्‍यात ज्‍यांना डॉक्‍टरइंजिनिअरइत्‍यादी व्‍हायचे आहे त्‍यांना या विषयाचा फारसा उपयोग नाही. हा गैरसमज आहे. खरी वस्‍तुस्थिती अशी आहे की चित्रकला हा विषय नसुन ती एक शिस्‍त आहे. की ज्‍या मधून इतर विषय ही योग्‍य प्रकारे शिकता येतात. ज्‍या विद्यार्थ्‍यास सुंदर लयबध्‍दगोष्‍टी पाहून आनंद होतो त्‍याची संवेदशक्ती सचेत होते व चांगल्‍या कलात्‍मक गोष्‍टी स्‍वतबनविण्‍यास प्रवृत होतो. असा विद्यार्थी आपल्‍या आयुष्‍यास सुत्रबध्द आकार देतो. कोणत्‍याही क्षेत्रात तो कमी पडत नाही. त्‍याला जीवन कलारसिकतेने जगण्‍याची सवय लागते ज्‍यामुळे तो त्‍याच्‍या जीवनातील कठीण परिस्थितीतही त्‍याच्‍या मनाचा तोल जावून देत नाही.

    लहानपानापासून कलेचे संस्‍कार मनावर घडल्‍यास व्‍यक्तिमत्‍त्‍वाला एक गहिरेपणा प्राप्‍त होतो. म्‍हणून शालेय जीवनात चित्रकलेचा अंर्तभाव असणे क्रमप्राप्‍तच ठरते. जगातील अनेक शिक्षणतंज्‍ज्ञांना त्‍याची प्रखरतेची जाणीव झाली आहे. वैफल्‍यक्रौर्यन्यूनगंडअसहाय्यताअनेक प्रकारच्‍या मानसिक विकृती या आजच्‍या समाजातील प्रकर्षाने जाणवणा-या प्रवृती नाहीशा करावयाच्‍या असतील तर जीवनाला क्रियाशीलतेचे वळण लावणे आवश्‍यक आहेहे वळण लावण्‍यासाठी साधा सरळ मार्ग म्‍हणजे मुलांना सुंदर गो‍ष्‍टीत रमण्‍याची संधी देणे. अशी संधी कलेद्वारे सहज शक्‍य होते. या पार्श्‍वभूमिवर विचार करताशाळेत चित्रकला शिक्षणाचे महत्‍व आहे. याची कल्‍पना येईल.

    कला शिक्षणाचा मूळ हेतू फक्त मनाला वळण लावणे नसून संपूर्ण जीवनाला नीट वळण लावणे आहे.

 लहान मुलाच्‍या मनात दडून बसलेल्‍या भाव-भावनासुप्‍त निर्माणक्षम शक्‍ती यांना वाव देवून त्‍यांच्‍या व्‍यक्त्मित्‍त्‍वाचा विकास करणे हे शालेय कलाशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्‍ट आहे. हे मानावेच लागेल.

मार्च २०२४ पासून शाळेत चित्रकलेचा विशेष वर्ग सुरू केला आहे. चित्रकलेत पारंगत आणि सर जे.जे. महाविद्यालयातून  Bachelor Of Fine Arts पदवी प्राप्त श्री.संदिप डांगे यांच्या पुढाकाराने हा वर्ग सुरू आहे. दर रविवारी  सकाळी ९ .३० ते १२ .३० वाजता हा चित्रकला वर्ग असतो. चित्रकला,रंगकला बेसिक पासून प्रोफेशनल लेवल पर्यंत मुलांना घडवण्याचा आमचा मानस आहे.

पण चित्रकला शिकण्याचा प्रवास वाटला तेवढा सोप्पा नाही, याची प्रचिती साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानात गेल्यावर आली. साहित्यांची किंमत पाहिल्या आणि आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोऱ्हे बुद्रुक  येथील विद्यार्थ्याना हे सर्व परवडणारे नाही याची खात्री झाली.

पण ,चित्रकला शिकण्याचा हा प्रवास थांबवायचा नाही ,असे मनोमन ठरवले आहे. त्यामुळे हा खटाटोप. ३५-४०  मुलांच्या  वर्गासाठी सर्व साहित्य आणि इतर बाबींवर जवळपास १,००,०००-/ रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.  आजपर्यंतचा खर्च लोकवर्गणीतूच भागवला आहे. परंतू, आता खर्च मोठा आहे . या पत्राद्वारे आपणांस विनंती आहे कि, या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आपणांस जेवढी होईल तेवढी मदत करावी.

पुढील टप्प्यासाठी प्रति विद्यार्थी ७५० रू .  याप्रमाणे खर्च अपेक्षित आहे. आपण शक्य तितक्या विद्यार्थ्यांचा खर्च उचलू शकता.

बँक खाते माहिती - 

नाव- Mukhyadhyapak Jilha Parishad Prathmik Shala Gorhe Bk

IFSC- HDFCOPDCCB

AC No.- 061001600000332

Branch- Khadakwasla

Bank Name- PDCC Pune




Saturday, 3 August 2024



                                  

 

आमच्या शाळेतील श्रावणी ही इतर मुलांसारखी लगेच प्रतिसाद देत नाही. त्याचे कारण म्हणजे तिला असलेला श्रावणदोष  आणि त्याचमुळे तिला वाचादोष सुद्धा आहे. ती माझ्या वर्गात नाही पण कधीमधी माझ्या वर्गात बसली की मला तिची हि समस्या फार भयंकर वाटायची . शिक्षक जे बोलते तेच तिला ऐकू येत नसेल तर वर्गात बसून तिला काही फायदा होणार नाही हे मला नेहमी वाटायचे. श्रवणयंत्र हे त्यासाठी एकमेव उपाय आहे हे मला अनेकांनी सांगितले. तिला तत्काळ श्रवणयंत्र बसवावे लागेल हे डॉक्टरांशी बोलल्यावर त्यांनी मला सांगितले आणिचांगले यंत्र पाहिजे असल्यास  दोन्ही कानांच्या मशीन साठी जवळपास  50,000 रूपये मोजावे लागतील हेही सांगितले.
 
अनेक दिवसांपासून मी सद्गुरू सेवा Foundation यांच्या संपर्कात आहो. आमचे मित्र श्री.सचिन म्हसे यांनी अनेकदा शाळेसाठी आणि मुलांसाठी मदत केली आहे. 
श्रावणी चा विषय म्हसे सरांना सांगितला आणि मग ते मदत करायला तयार झाले. अनेक doner च्या मदतीने आज श्रावणी ला मस्त पैकी  ४६,०००  रूपयांचे श्रवणयंत्र मिळाले. 

ती ऐकेल आणि शिकेल एवढंच समाधान .







 

Sunday, 9 June 2024

 'धनु' ....... अशी हाक मारल्यावर 'हो सर ' अशी साद आता ऐकायला मिळणार नाही.    धनश्री म्हणजे धनु शाळा सोडून गेली. शाळा सुरू झाल्यावर ती वर्गात  नसेल ही भावनाच फार वेदना देणारी आहे. पालकांचे कामासाठी होणारे स्थलांतर आणि त्यामुळे अनेक दिवसांपासून घडवलेली मुले शाळा सोडून जाणे  ही समस्या माझ्यासारख्या शिक्षकांना फार अवघड स्थितीत टाकते.  धनु अनेक चांगल्या गुणांनी समृद्ध असलेली मुलगी. हुशार,चाणाक्ष, प्रेमळ , काहीतरी मोठे करण्याची आकांक्षा अशा कितीतरी गुणांनी ती परिपूर्ण आहे. आम्ही कितीतरी गोष्टी हसत-खेळत शिकलो. 

शिक्षक शाळेत अनेक विद्यार्थी घडवत असतो पण काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना बघून शिक्षक स्वतः घडत असतो. धनश्री त्यापैकीच एक. अभ्यासात ,उपक्रमांत ,स्पर्धांत अनेक वेळी तीने शाळेचे नाव केले आहे. मी एखाद्या चुकीवर तिला रागावलो  तरी क्षणात जवळ येणारी धनु आता माझ्या  जवळ नाही.

तिच्यामुळे अनेकदा मी ,शाळेने अभिमानस्पद क्षण अनुभवले. विज्ञान प्रदर्शनात अगदी  वेळेवर तिने दिलेले भाषण असो की बालेवाडी येथील राष्ट्रीय विज्ञान परिषदेत तिने तेथील Science Talk येथे विचारलेला प्रश्न आणि त्यासाठी तिला आणि शाळेला मिळालेली दाद मी कधीच विसरू शकणार नाही.  

आमच्या शाळेत सुरु असलेल्या 'माझा गाव माझी बातमी' या channel ची ती प्रमुख घटक . आता ती नाही तर यावर्षी शून्यातून सर्व सुरु करावे लागेल. तिच्यासाठी मी अनेक गोष्टी ठरवल्या होत्या , पण .... 

शाळेतील अशी एकही गोष्ट नाही ज्यात तिचा सहभाग नसेल. प्रत्येक कामात  ती पुढे होती. माझ्याही पुढे. ती होती तर मलाही चार हात असल्यासारखे वाटत होते. तिने माझी फार काळजी घेतली. 

ती शाळेत नसली तरी तिचा भास मला प्रत्येक ठिकाणी होईल. वर्गात शिकवतांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर कुणालाच आले नाही तेव्हा ती आठवेल.

आमच्या शाळेचा ती भक्कम पाया होती. आमच्या प्रयोगशाळेतील ती महत्वाचा भाग होती. ती माझा उजवा हात होती.  ती जावू नये असे मनापासून वाटत होते पण मी तिला थांबवू शकलो नाही. मी जितके तिला प्रेम दिले त्यापेक्षा कितीतरी पटीने तिने मला दिले.  निरोप देतांना माझ्या छातीशी कवटाळलेल्या धनुला सोडूच नये असे वाटत होते. पण ती गेली, अनेक  आठवणी ठेवून.

तु माझ्या मनाच्या सर्वात सुंदर कप्प्यात सदैव राहशील,धने.

 

खूप प्रेम











Saturday, 4 May 2024

शहरी भागातील शालेय मुलांना समर कॅम्प ही गोष्टी फार नवी नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की शहरी भागातील पालकांची लगबग सुरू होते ती एखादा समर कॅम्प बघून त्यांच्या पाल्यांना तिथे पाठवण्याचा . त्यासाठी मोठा खर्च करायलाही ते मागे-पुढे बघत नाही. पण ग्रामीण भागातील मुलांना यासारख्या गोष्टीं अनोळखीच असतात. त्यामागे अनेक करणे आहेत.

मला नेहमी वाटते कि नव्या अनुभवांचे, नव्या गोष्टींचे ताट विद्यार्थ्यांपुढे मांडणे हेच एका शिक्षकाचे काम असते. पोरांनी त्यातले त्यांना जे लागते ते घ्यावे,मनमुराद खावे आणि काही शिदोरी म्हणून बांधून न्यावे. असेच काहीसे करण्याचा प्रयत्न मागील दोन वर्षांपासून उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. एकही रुपया शुल्क न आकारता लोकवर्गणीतून या संपूर्ण उन्हाळी शिबिराचा खर्च भागविला जातो.

या वर्षीही असाच समर कॅम्प शाळेत सुरू आहे. वेळ मिळाल्यास नक्की भेट द्या.




  Project- कणाद :  Science Exibition Platform कणाद हा तुरिय लॅबचा प्रमुख प्रकल्प आहे, जो मुलांमध्ये सर्जनशीलता, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्य...