Friday, 10 March 2023

 व्यक्तिविशेष- 

श्री. मिलिंद जी पगारे 
२०१८ मध्ये मिलिंद जी सोबत ओळख झाली. सेवानिवृत्त झाल्यावर सामान्य माणसाची जी दिनचर्या असते त्यापेक्षा वेगळे जीवन जगणारे मिलिंद सर माझ्यासारख्या तरुण शिक्षकाला प्रेरणास्थान आहेत. आराम करण्याच्या या वयातही महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक शाळांमध्ये ,संस्थांमध्ये प्लास्टिक निर्मूलन, देहदान,अवयवदान यांसारख्या अनेक विषयांवर मिलिंद जी मार्गदर्शन करतात आणि तेही कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा करतात. २०१८ मध्ये ज्यावेळी मी या शाळेत रुजू झालो होतो त्यावेळी त्यांनी शाळेत एक वर्कशॉप घेतला होता त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी आमची पुन्हा शाळेत भेट झाली. मुलांनी तास भरात भरपूर गोष्टी शिकल्या ज्या त्यांच्यासाठी पुढे शिदोरी ठरणार आहे. दुसऱ्यांसाठी धडपणाऱ्या मिलिंद जी ना मी धन्यवाद देतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. 








Thursday, 16 February 2023


परवा एका मित्राशी फोन झाला. तोही शिक्षकच आहे. त्याच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीविषयी तो सांगत होता. त्या विद्यार्थिनीच्या घरी काहीतरी झाले आणि त्या ताणामुळे ती खूप दिवसांपासून वर्गात शांत च होती. बोलणे-हसणे बंदच होते. नंतर खरे कारण समजले. सर्वांनी तिची समजूत काढली तेव्हा कुठे ती नॉर्मल वागायला लागली. पण या ताणाच्या काळात जर तिने नको ते पाऊल उचलले असते तर ?.. हा विचार माझ्या मनात पर्वापासून रेंगाळत आहे. मुलांना बाहेरची काही समस्या असल्यास ते घरी आई-वडिलांना सांगतात पण घरी काही झाले तर ते कुणाला सांगतील. त्या मुलीला तिच्या सरांशी का बरं बोलावसं वाटले नाही ? मुले दिवसभर शाळेत असतात, लहान मोठ्या अनेक गोष्टी शिक्षकांना सांगतात. पण अशा गोष्टी बोलायला मुलांची का बरं हिम्मत होत नाही ?
शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांशी असे नाते बनवायला कुठे कमी पडतोय काय ?

मी विद्यार्थ्यांशी वागतांना , बोलतांना त्यांच्याशी मित्रत्वाच्या भावनेनेच बोलतो. पण वरील प्रसंगाने मला जरा भीतीच वाटली. माझ्या विद्यार्थ्यांना अशा काही समस्या तर असणार नाही ना ? ते मला सांगायला संकोच तर करीत नसतील ना ? किंवा त्यांना मला जेव्हा सांगायचे असेल तेव्हा मी त्यांच्यासाठी उपलबध नाही असे तर नसेल ना ?

खरं म्हणजे अशा वेळी मी शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी उपलब्ध असायलाच पाहिजे. Child Helpline या विषयी मी मुलांना नेहमीच सांगत असतो. पण कधी कधी वाटते असे करून मी आपली जबाबदारी झटकून टाकतोय कि काय ? 
मुले माझ्यापर्यंत कधीही पोहचावी या हेतूने मी मुलांसाठी '𝙃𝙚𝙡𝙥 𝙈𝙚 𝙎𝙞𝙧' सुरु केलंय . काहीही समस्या असो, कधीही असो मी नेहमी त्यांच्या मदतीसाठी आहे हाच हेतू. 


Sunday, 12 February 2023


                                                          Back Benchers...

Saturday, 11 February 2023

शनिवार - दप्तराविना शाळा

Seed Balls
वनसंपदा संपवण्यासाठी हजारो टोळ्या कार्यरत आहेत, तशाच वनसंपदा जगवण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी तितक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक हात कार्यरत आहेत. मात्र, ज्या ठिकाणी रोपं लावायची किंवा बीजारोपण करायचं ती ठिकाणं रहिवाशी क्षेत्रापासून लांब असतात. करिअर, नोकरी, कुटुंब सोडून नियमित त्या ठिकाणी जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश वृक्षारोपणाच्या चळवळी या नागरी वसाहतींच्या चौफेर मर्यादित राहिलेल्या दिसतात. समजा कुणी दूर अंतरावर जाऊन एखाद्या माळरानावर किंवा डोंगरावर बीजारोपण केलं किंवा रोपटी लावली तरीही त्यातल्या बहुतांश रोपांच्या नशिबी पुढचा पावसाळा नसतो. उन्हाळ्यात स्थानिकांना पिण्यासाठीही पाणी राहत नाही, अशा वातावरणात रोपांच्या वाट्याला घोटभर पाणी यावं, अशी अपेक्षा मृगजळासारखी ठरावी.
अशा प्रतिकूल परिस्थितीत वनीकरणाचा विचार रुजवायचा असेल तर त्यासाठीची पद्धतीही बदलावी लागणार आहे. त्याच अनुषंगाने गेल्या पाच वर्षांत बियांची रुजूवात करण्यासाठी ’सीड बॉल्स’ ही अत्यंत सोपी, स्वस्त आणि उपयुक्त संकल्पना वापरली जाते आहे.यात माती, शेणखताचा वापर करत गोळे बनवले जातात. त्यात जांभूळ, बोर, शिवण, आवळा, बकूळ, पांगारा, अमलताश, विलायती चिंच, फणस, आंबा अशा विविध झाडांच्या बिया खोवल्या जातात. हे सीड बॉल्स पावसाळ्यात त्यातल्या बिया आणि पर्यावरणासाठी अत्यंत पोषक ठरतात. बाहेर कडाक्याचं ऊन आणि तोंडावर आलेला पावसाळा असा हा काळ सीडबॉल्स बनवण्यासाठी सर्वोत्तम आहे. एकदा पावसाळा सुरू झाला की, तयार केलेले सीडबॉल्स घेऊन मोहीमेवर निघता येतं. हे गोळे निश्चित केलेल्या ठिकाणी दूरवरुन फेकून दिले तरीही चालतात. शेणमातीच्या मिश्रणामुळे ते फुटत नाहीत.
काही दिवसांआधी शाळेत Ignited Minds तर्फे आयोजित चर्चासत्रात Paper Seed Balls विषयी माहिती मिळाली. आज शनिवारी , दप्तराविना शाळेच्या दिवशी मुलांनी हसत-खेळत शंभरावर सीड बॉल्स तयार केलेत. आवरण या बियांना ऊब आणि ओलावा असं पोषक वातावरण मिळवून देत असतं. रुजताना फार कष्ट लागत नसल्याने, आलेली रोपं अधिक चांगली आणि वेगाने मोठी होतात.



https://youtube.com/shorts/x_ANy6V-KqY?feature=share

Thursday, 26 January 2023

गणराज्य दिन - संविधान विशेष 


Saturday, 24 December 2022

 मागील वर्षी सुरु केलेल्या तुरिया लॅब मुळे अतिशय चांगला बदल मुलांमध्ये दिसून येतोय. STEM वर आधारित या प्रयोगशाळेत आता मुलांना विविध कलात्मक गोष्टी सुद्धा करायला मिळत आहेत.

तुरिया लॅब ही संकल्पना Ajay daa ने फार मनातून आणि तळमळीने सुरु केली आहे. अजय दा सध्या अमेरिकेत स्थायिक असून , ग्रामीण भागातील मुलांना विज्ञान अधिक कृतियुक्त पद्धतीने शिकता यावे यासाठी त्यांची धडपड आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये छोटीशी प्रयोगशाळा असावी या हेतूने त्यांनी 'तुरिया लॅब ' ही संकल्पना पुढे आणली आहे.
मागील वर्षी माझ्या शाळेत सुरु केलेली प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी त्यांची आवडती जागा झालेली आहे.
तुरिया लॅब आता इतर शाळांमध्येही सुरु करावी या हेतूने आज आमचे प्रयोगशील मित्र राहुल जी वाघमारे यांच्या जिल्हा परिषद शाळा निगडे मोसे येथे प्रयोगशाळेची स्थापना आज करण्यात आली. एकमेकांच्या सहकार्याने आपण अनेक गोष्टी आत्मसात करू शकतो आणि याचीच ही सुरूवात आहे, असे म्हणायला हरकत नाही.






Sunday, 18 September 2022

 मागच्या आठवड्यात शाळाबाह्य असणाऱ्या काही विदयार्थ्यांना आम्ही शाळेच्या मुख्य प्रवाहात आणू शकलो. आदिवासी समाजातील ही मुले आणि त्यांचे कुटुंब मुख्य समाजधारेतून वेगळे आहेत. ही मुले शाळेत टिकावी यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. आमचे मित्र नरेंद्र सर, अमर सर आणि सचिन सर यांनी आज पुढाकार घेऊन या मुलांना अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले. यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत कुठलीही अडचण येऊ नये आणि यांचा शैक्षणिक प्रवास अविरत सुरु रहावा हीच अपेक्षा .

Last week we were able to bring some of the out-of-school students in mainstream. These tribal children and their families are separated from the mainstream society. Efforts are currently underway to ensure that these children stay in school. Our friends Narendra sir, Amar sir and Sachin sir took the initiative today and gifted many kinds of educational materials to these children. It is hoped that there should not be any problem in their educational process and that their educational journey continues uninterrupted.







Monday, 18 July 2022



   

आज रविवार ची सुट्टी मजेत गेली. मागील काही दिवसा आधी जयश्री ताई चा फोन आला .  त्यांनी आणि त्यांच्या संस्थेने सुरु केलेल्या Kinderuni या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी  शाळेतील मुलांना घेवून या असे त्या म्हणाल्या . जयश्री ताई या Goeth Institute Max Mueller Bhavan ,Pune BKD च्या प्रकल्प प्रमुख आहेत. Goeth Institute ही फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी ची जर्मन भाषा शिकविणारी प्रमुख संस्था आहे. इतर देशात जर्मन भाषा शिकण्यासाठी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या संबंधी प्रोत्साहन देते. तिथे जाणे मुलांसाठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असेल हे माहित होते म्हणून मी पण होकार दिला .
      आज प्रत्यक्ष तिथे गेल्यावर माझ्यापेक्षा मुलांना भन्नाट मज्जा आली. परत येतांना गाडीमध्ये मुलांची आजच्या कार्यशाळेबद्दल  चिवचिव ऐकूण आजचा दिवस सार्थकी ठरला यात शंका नाही.
Kinderuni लहान मुलांना  त्यांच्या रोजच्या जीवनातील गोष्टींमधील विज्ञान रंजक पद्धतीने उलगडून दाखविते आणि त्यांची विज्ञानाची गोडी वाढविते. आणि सोबतच इतर भाषेतील काही नवीन शब्द शिकण्याची संधी देते.
 
   जर्मन भाषेतील अनेक शब्द मुले शिकली. आणि त्यांची ती बडबड ऐकून मला पण ते शब्द शिकता आले.मुलांना काहीतरी नवीन गोष्टी शिकता याव्यात त्यासाठी तिथे विज्ञान विषयावर सुद्धा ऐक सेशन होते. सुर्यऊर्जा आणि त्याचे फायदे ,यावर सखोल माहिती मुलांना मिळाली. गोष्टीच्या सेशन मध्ये तर  मुलांना भारीच मज्जा आली. खेळतानी उत्साह मुलांच्या चेह-यावर खुलून देशात होता..
आज काहीतरी नवीन शिकता आले.
आणि हो सर्व मुलांच्या सुरक्षेसाठी , जेवणासाठी जी व्यवस्था केली ती तर अप्रतिम होती.   



How to use kinderuni website-

You have to go to the website. Open an account and sign in. Once you are on the page of Kinderuni you will see in the right hand corner languages. You need to choose a language like german / English / Marathi etc. Then the lessons will appear in that language. Choose a lesson you want to go through and start. You can do it at your pace, according to your liking. Parents can help the children and by opening their own account they can also check their children's progressby




Thursday, 2 June 2022


        समर कॅम्प म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना नवीन गोष्ट . उन्हाळ्याच्या सुट्टीत असे सेमिनार होतात हे फक्त काही मुलांना माहित असते एवढंच. माझ्या शाळेतील मुलानांही समर कॅम्प आणि त्या अंतर्गत होणाऱ्या ऍक्टिव्हिटीचा अनुभव मिळावा या हेतूने या वर्षी पहिल्यांदाच माझ्या जिल्हा परिषद शाळेत समर कॅम्प चे आयोजन करण्याचे ठरविले . आराखडा तयार केला ,कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या , त्यासाठी काय काय साहित्य लागेल या आणि अशा अनेक गोष्टींची यादी तयार केली.क्राफ्टिंग,आकाशदर्शन,रोपवाटिका तयार करणे,विज्ञान कार्यशाळा,बॉलीवूड डान्स कार्यशाळा,कलाजत्रा ,डिझायनिंग ड्रेस workshop , मॉडेल डिझायनिंग workshop,वारली चित्रकला ,भाषिक खेळ,सापांविषयी माहिती,परदेशातील विद्यार्थ्यांशी सांस्कृतिक देवाणघेवाण,मुंबई येथील नेहरू सेंटर येथे फिल्ड ट्रिप,अक्षर कार्यशाळा,आनंद मेळावा,लोकनृत्य कार्यशाळा,गोष्टींची शाळा या सर्व विषयांचा समावेश या समर कॅम्प मध्ये केला. सर्व ठरल्यावर या ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी लोकांची शोधाशोध सुरु झाली आणि काय भारी माणसे यावेळी भेटली . कुलकर्णी मॅडम,गौरव सर,अपर्णा ताई,भावना मॅडम ,अनुषा,तेजल,श्रीबा,प्राची ताई,संदीप,प्रियंका ताई, हनुमंता काका,मनन सर ,मलशेट्टी सर ,ऋषिकेश,प्राची ,कल्पेश ,राम हे प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात उत्तम असूनही पाय अजूनही जमिनीवर रोवलेले.
खरं म्हणजे तुम्हा सर्वांमुळे मुलांना भरपूर देता आले. या समर कॅम्प मध्ये मुलांनी भरपूर मज्जा केली ,खूप हसले,खूप खेळले ,खूप शिकले. भविष्यातील उत्तम नागरिक होण्यासाठी हा अनुभव नक्कीच त्यांना फायद्याचा ठरेल .👇तुमचे विशेष आभार….🤗🙏👇Shirish sir
Keki Unwalla
Er Amol Botre
Shrikant Dagade
Makarand Anil Ghewari-patil
Swapnil Pathare
Sushant Khirid
Sandip Khirid
Manan Bhatia
खरं म्हणजे तुम्हा सर्वांमुळे मुलांना भरपूर देता आले. या समर कॅम्प मध्ये मुलांनी भरपूर मज्जा केली ,खूप हसले,खूप खेळले ,खूप शिकले. भविष्यातील उत्तम नागरिक होण्यासाठी हा अनुभव नक्कीच त्यांना फायद्याचा ठरेल .👇तुमचे विशेष आभार….🤗🙏Shirish sir👇Keki Unwalla
Er Amol Botre
Shrikant Dagade
Makarand Anil Ghewari-patil
Swapnil Pathare
Sushant Khirid
Sandip Khirid
Manan Bhatia
खरं म्हणजे तुम्हा सर्वांमुळे मुलांना भरपूर देता आले. या समर कॅम्प मध्ये मुलांनी भरपूर मज्जा केली ,खूप हसले,खूप खेळले ,खूप शिकले. भविष्यातील उत्तम नागरिक होण्यासाठी हा अनुभव नक्कीच त्यांना फायद्याचा ठरेल .
👇तुमचे विशेष आभार….🤗🙏👇Shirish sir
Keki Unwalla
Er Amol Botre
Shrikant Dagade
Makarand Anil Ghewari-patil
Swapnil Pathare
Sushant Khirid
Sandip Khirid
Manan Bhatia
काही क्षणचित्रे


आकाशदर्शन


सुंदर अक्षर कार्यशाळा




Dance workshop



विदेशातील विद्यार्थ्यांशी सांस्कृतिक देवाणघेवाण


सर्किट तयार करणे



ओरिगामी




आनंद मेळावा




कलाजत्रा


गोष्टीची शाळा



फिल्ड ट्रिप -मुंबई





लोकनृत्य with प्राची



गोष्टींची शाळा - ऋषिकेश




विज्ञान सेमिनार



रोपवाटिका



समारोप
-------------------------------






Monday, 7 March 2022

 


नक्षत्रवन ही संकल्पना भारतीय संस्कृतीशी निगडित आहे. गेल्या काही वर्षांत वनसंपदेची अमर्याद तोड झाल्याने अनेक औषधी महत्त्व असणारी झाडे आता दुर्मिळ झाली आहेत. या झाडांना जगविण्यासाठी आता प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रत्येक गावाने नक्षत्रवन ही संकल्पना राबविणे आवश्‍यक आहे. या वनामुळे नागरिकांना दुर्मिळ झाडांची माहिती होईल. या झाडांची उत्तम जोपासना केल्यावरच ती चांगल्याप्रकारे जगतात. नक्षत्रवनामध्ये निवडलेली झाडे ही जास्तीत जास्त प्राणवायूचा पुरवठा करणारी आहेत. त्याचप्रमाणे औषधी गुणधर्म असणारीही आहेत, त्यामुळे प्रदूषणावर मात करणारी जैविक विविधतेचे संवर्धन वृक्षलागवडीच्या माध्यमातून होते.

प्रत्येक नक्षत्राचे एक झाड असते. प्रत्येक व्यक्ती विशिष्ट नक्षत्रात जन्मलेली असते म्हणून त्या नक्षत्राचे झाड हे त्या व्यक्तीचा आराध्य वृक्ष समजला जातो. या समजाचा आधार घेऊन जनजागृती केल्यास निश्‍चितच या संकल्पनेला चालना मिळेल. या वनामध्ये प्रत्येक व्यक्तीने दर वर्षी एक झाड लावावे, त्याचे संगोपन करणे आवश्‍यक आहे.

विविध कारणांमुळे वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळेच जागतिक पातळीवर तापमानवाढ मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. वाढती जंगलतोड हे महत्त्वाचे कारण आहे. वृक्षलागवड, संवर्धन, जतन ही काळाची गरज झाली आहे. 


नक्षत्रवनातील महत्त्वाची झाड- ः


नक्षत्राचे नाव ---- वृक्ष

अश्‍विनी --- कालरा

भरणी -----आवळा

कृत्तिका------ उंबर

रोहिणी------ जांभूळ

मृगशीर्ष --------खैर

आर्द्रा ---------कृष्णागरू (पर्यायी वृक्ष ः बेहडा, चंदन)

पुनर्वसू------ कळक

पुष्य -------पिंपळ

आश्‍लेषा -----नागचाफा

मघा -----वड

पूर्वा फाल्गुनी------- पळस

उत्तरा फाल्गुनी ------ पायर

हस्त------ जाई

चित्रा ------बेल

स्वाती -----अर्जुन

विशाखा -----नागकेशर

अनुराधा ------नागकेशर

ज्येष्ठा -------सावर

मूळ ----------राळ

पूर्वाषाढा ------वेत

उत्तराषाढा ------फणस

श्रवण-------- रुई

धनिष्ठा--------- शमी

शततारका --------कळंब (पर्यायी वृक्ष - कदंब/निव)

पूर्वा भाद्रपदा ------आंबा

उत्तरा भाद्रपदा------- कडुनिंब

रेवती -----------------मोह



Tuesday, 25 January 2022


 सह्याद्रीच्या  कुशीत लपलेले चांदर गाव आणि त्याभोवतीचा परिसर म्हणजे निसर्गाने भरभरून देणगी दिलेले वरदान आहे . पण त्याच बरोबर , कष्ट, हाल, अंधार आणि अशा गोष्टी येथील लोकांच्या वाट्याला आल्या आहेत ; ज्या सामान्य माणसाला नको वाटतात. ज्या गोष्टी आपल्याला संकटे वाटतात त्या येथील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे असे म्हणायला हरकत नाही.  मागच्या महिन्यात संकल्प , अविनाश आणि त्याचा दक्षिण आफ्रिकेतील मित्र आरिमामी यांनी या चांदर आणि परिसरातील जीवनमान आणि   अडचणी  यांवर आधारित एक १५ मिनिटांची शॉर्ट मुव्ही तयार केली. या तरुण मुलांनी केलेला हा प्रयत्न नक्कीच बाहेरील जगाची या भागातील लोकांशी  ओळख करण्यास मदत करेल. 

संकल्प , अविनाश आणि आरिमामी तुम्ही फार कमी वेळात कष्टाने हे साध्य केले ,खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. 


या शॉर्ट मुव्हीचे स्क्रिनिंग २६ जानेवारी २०२२ ला चांदर गावात च होणार आहे. नक्की या. 

Sunday, 23 January 2022

मागील दोन वर्षांपासून कोरोनाने जे थैमान घातले आहे त्यात सर्वात जास्त नुकसान हे शिक्षण क्षेत्राचे आणि शाळकरी मुलांचे झाले आहे. lockdown काळातही शिक्षक म्हणून जे जे मुलांना देता येईल ते देण्याचा प्रयत्न प्रत्येकानी केला आणि करत आहेत. दिवाळीच्या आधी शाळा काही प्रमाणात सुरु झाल्या आणि सर्व शिक्षक , पालक आणि मुलांना फार आनंद झाला. परंतु. हा आनंद फार जास्त वेळ टिकला नाही. ओमायक्रॉन मुले शाळेला पुन्हा कुलूप लागले आणि Online शिक्षण पुन्हा सुरु झाले. 
               ऑनलाइन शिक्षण हाच सध्या पर्याय असला तरी त्यामुळे विद्यार्थ्यांवर होणारे दूरगामी विपरीत परिणाम आपल्याला लक्षात ठेवले पहिले. असो , यावर चर्चा म्हणून हा लेख नाही.  
जोपर्यंत मुलांपर्यंत शिक्षक पोहचणार  नाही तोपर्यंत मुलेही आनंदाने शिकणार नाही असे मला वाटते. 
सध्या माझी शाळा ज्या गोऱ्हे बुद्रुक गावात आहे ते गाव म्हणजे निसर्गाची खाण. झाडे, नदी , भरपूर पाणी , पक्षी  हे रोजचेच दृष्य . एकदा असेच गावात फिरताना ' ग्रीन थंब ' यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या ही मोकळी  झोपडी मला दिसली. 



चारही बाजूला हिरवीगार शेती आणि पुढे भली मोठी नदी (धरणाचा पाणीसाठा ) असे एकंदरीत चित्र त्या झोपडीत बसल्यावर दिसते.  शांत वातावरण ,पक्ष्यांचा चिवचिवाट ,नदीच्या पाण्याचा मंद आवाज या गोष्टी अलगत कानावर पडतात आणि आपण कुठेतरी ध्यान साधनेला आलो कि काय, असे वाटते. 
दुसऱ्या दिवसापासून माझे थोडे विद्यार्थी आणि मी येथे बसून अभ्यास करू लागलो. हळूहळू मुले वाढली आणि आता या झोपडीला शाळेचे स्वरूप मिळाले. योगा, खेळ यापासून सुरू केलेल्या या वर्गात आता मुले विज्ञान आणि गणिताचाही अभ्यास मोठ्या आवडीने करतात. वाचनाचा तास असो किंवा इंग्रजीचे कोडे मुले सर्व ऍक्टिव्हिटी आनंदाने येथे करतात . 

'ग्रीन थंब ' हा उपक्रम ले. कर्नल सुरेश पाटील (निवृत्त ) यांच्या पुढाकाराने सुरु झाला आहे.  राष्ट्रीय एकात्मतेचा ध्वज खांद्यावर घेऊन माणुसकीच्या विचारांसाठी व पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे हेच ब्रीद आता पाटील सरानी अंगिकारले आहे असे म्हणायला हरकत नाही. 
'जस्टीस फॉर जवान ' , 'छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड ' या आणि अशा समाजपयोगी संस्थांद्वारे सुद्धा त्यांनी अनेक कार्य केले आहे. 

काल त्यांना भेटण्याचा योग आला . घरदार विकून भाड्याच्या घरात राहूनही देशसेवा , समाजसेवा अविरत सुरु ठेवलेल्या या व्यक्तीकडून अनेक गोष्टी मला शिकता आल्या. साधे राहूनही मोठे होता येते हे त्यांच्याकडे पाहूनच समजते.  खडकवासला धरणक्षेत्रात निसर्ग संवर्धनात मोलाची भूमिका बजावणारे पाटील सरानी त्यांच्या घरी सुद्दा निसर्गाचे संगोपन फार आत्मयतीने केले आहे. 



१९७१ च्या भारत - पाक युद्धात लढलेले हे भारतमातेचे सुपुत्र निवृत्त झाल्यानंतरही देशसेवेचे व्रत पळत आहेत असे म्हणायला हरकत नाही.  जयहिंद सर. 


The education sector and school children have suffered the most in the last two years. Even during the lockdown, as a teacher, everyone tried and is trying to give what they can to the children. Schools started somewhat before Diwali and all the teachers, parents and children were very happy. But. This happiness did not last long. Omicron  re-locked the school and online learning resumed.
               Although online learning is an option right now, we have noticed that it has far-reaching adverse effects on students. I don't think children will learn happily unless the teacher reaches out to them.

        The village where my school is currently located in Gorhe Budruk is a mine of nature. Trees, rivers, plenty of water, birds are a daily sight. Once while walking around the village, I saw this empty hut built by 'Green Thumb' initiative. The overall picture of greenery on all four sides and a large river (dam reservoir) in front of the hut can be seen. The quiet atmosphere, the chirping of birds, the faint sound of the river water are all heard separately and it seems as if you have come somewhere to meditate.
From the next day my little students and I sat here and started studying. Gradually the number  of  children grew up and now this hut has got the look of a school. Starting from yoga and sports, the children now study science and mathematics with great interest. Whether it's a reading hour or an English puzzle, kids happily do all the activities here.
                  'Green Thumb', has been started with the initiative of Colonel Suresh Patil (Retd.).  Patil Sir has now embraced the spirit of working for the cause of humanity and protection of the environment by carrying the flag of national unity on his shoulders.
He has also done a lot of work through 'Justice for Jawan', 'Chhatrapati Shivaji Muslim Brigade' and other such social organizations.

Yesterday I met him. I  learned many things from this person who continued his national service and social service even after selling his house and living in a rented house. One can understand that one can grow up even by being simple. Patil Sir, who plays an important role in the conservation of nature in the Khadakwasla dam area, has taken care of nature in his home with great care.

I strongly say  that,  sons of Bharatmata, who fought in the Indo-Pak war of 1971, are still on a vow of national service after their retirement. Jaihind Sir.










 

  व्यक्तिविशेष-  श्री. मिलिंद जी पगारे  २०१८ मध्ये मिलिंद जी सोबत ओळख झाली. सेवानिवृत्त झाल्यावर सामान्य माणसाची जी दिनचर्या असते त्यापेक्षा...