शहरी भागातील शालेय मुलांना समर कॅम्प ही गोष्टी फार नवी नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की शहरी भागातील पालकांची लगबग सुरू होते ती एखादा समर कॅम्प बघून त्यांच्या पाल्यांना तिथे पाठवण्याचा . त्यासाठी मोठा खर्च करायलाही ते मागे-पुढे बघत नाही. पण ग्रामीण भागातील मुलांना यासारख्या गोष्टीं अनोळखीच असतात. त्यामागे अनेक करणे आहेत.
मला नेहमी वाटते कि नव्या अनुभवांचे, नव्या गोष्टींचे ताट विद्यार्थ्यांपुढे मांडणे हेच एका शिक्षकाचे काम असते. पोरांनी त्यातले त्यांना जे लागते ते घ्यावे,मनमुराद खावे आणि काही शिदोरी म्हणून बांधून न्यावे. असेच काहीसे करण्याचा प्रयत्न मागील दोन वर्षांपासून उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. एकही रुपया शुल्क न आकारता लोकवर्गणीतून या संपूर्ण उन्हाळी शिबिराचा खर्च भागविला जातो.
या वर्षीही असाच समर कॅम्प शाळेत सुरू आहे. वेळ मिळाल्यास नक्की भेट द्या.
No comments:
Post a Comment